Pratibimb

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

झपाट्याने बदलणारी खेडी

परवा रात्रीच गावावरून आलो. २-३ महिन्यात एकदा तरी भेट देतोच. बालपण तिकडे गेल्यामुळे विशेष आकर्षण अजूनही आहेच. पण गेल्या ७-८ वर्षांपासून खूप झपाट्याने बदल झालेले दिसतात. शहरातल्या सुख-चैनी आता तिकडे सुद्धा पोहोचल्या आहेत. सर्वच मातीच्या घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. शेतकर्यांना आता शेतात जाण्यासाठी सायकली किंवा बैलगाडी ची आवश्यकता नाही प्रत्येकाकडे मोटारसायकली आहेतच. सूर्योदयापूर्वी शेतात जाणारा शेतकरी आज ११ वाजेपर्यंत घरीच दिसतो. शहराप्रमाणे कमी कामात जास्त दाम घेण्याची वृत्ती आज तिकडेही दिसून येते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आल्यामुळे गाणे डाऊनलोड करून ऐकण्यातच बराचसा वेळ जातो. घरोघरी रंगीत टीव्ही आल्या आहेत. आता त्यानाही सगळ्या चानेल्स ची नांवे माहित आहेत. एकाही मुलगा मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. तासंतास टीव्ही पुढेच बसलेला दिसतो. दिवाळी, होळी, अक्षयतृतीया, रंगपंचमी, नागपंचमी यासारखे सगळे सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करणाऱ्या खेड्यांमध्ये आज सामसूम दिसते.
जगाप्रमाणे आज खेडे गांवातही प्रगती होताना दिसत आहे. हजारो वर्ष गुरांप्रमाणे राबणारा व दुसर्यांना सुखी करणारा शेतकरी व मजूर वर्गाला सुखी बघून आनंदच होईल. यांत्रिक प्रगती सोबतच माणसाची मानसिक अधोगती होताना दिसते ती तिकडे नाही झाली तरच तो आनंद टिकून राहील. जगात सगळ्यात जुनी व भव्य अशी भारतीय संस्कृती आजही थोड्या प्रमाणात खेड्यातच पाहायला मिळते. पुढचे माहित नाही.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: